ReikiJal_Logo_page-0001-removebg-preview

रेकी जल एंटरप्रायझेस

पाणी बदला
जीवन बदला

शुद्ध, आरोग्यदायी, संरचित व ऊर्जायुक्त अल्कलाईन पाण्यासाठी सर्व प्रकारची जलप्रक्रिया.

आमची कथा

पाण्याच्या बळावर
जीवनात सकारात्मक परिवर्तन

महाराष्ट्र शासनाच्या जल प्रकल्प जल परिवर्तन या मिशन अंतर्गत जल परिवर्तन कीर्तनाने 2018 मध्ये पाणी आणि पाणी संशोधन या विषयावर काम करताना पाण्याची विविध रूपे पाहून मानवी जीवनाशी निगडित असलेल्या जलतत्त्वाविषयी आवड आणि जलचिकित्सा प्रक्रिया सुरू झाली.

आमची वाटचाल

पाणी, जागरूकता आणि परिवर्तनाची वाटचाल

जलसंवर्धन पाणी प्रक्रिया आणि जल किर्तन या पाणी संशोधनाच्या माध्यमातून दररोज हजारो लोकांना कीर्तनाचे माध्यमातून पाण्याचे मानवी जीवनातील महत्त्व बारा क्षार पद्धती, समुद्रातील क्षार (खारे पाणी) ते अमर करणारे अमृत हा पाण्याचा प्रकाराच्या एक लाख 25 हजार पाणी रूपांतरित करण्याच्या प्रवासाचा अथांग, गुढ, रहस्यमय अथक प्रवास जगातील सर्वात शुद्ध व ताकदवार पाणी म्हणजेच रेकी जल इथपर्यंत हा सुरू आहे आणि तो पुढेही अविरतपणे चालू राहील.

आमचे ध्येय

पाण्याच्या शक्तीद्वारे जीवन जागृत करणे

मित्रहो नमस्कार, सुखाचा, आनंदाचा व आरोग्याचा शोध घेणारे तुम्ही आणि आम्ही आपण सर्वजण रेकी जल द्वारा या जीवनाला व जगाला सुंदर बनवूया. हा संदेश तुम्ही वाचताय म्हणजे निश्चितच एक जीवन परिवर्तनाची मोठी चाहूल चेतना चेतावणी तुम्हाला आज माहीत होत आहे. अतिशय शांतपणे खालील सर्व माहिती वाचावी पहावी आणि विचार करा की आजच्या परिस्थितीमध्ये मी आणि माझ्या परिवाराला समाजाला व माझ्या देशाला आरोग्याकडे नेण्याची माझी, तुमची, आणि आपल्या प्रत्येकाची मोठी जबाबदारी आहे. मित्रहो, या सृष्टी मध्ये जल, पृथ्वी, आकाश, वायू आणि अग्नी ही पंचमहाभूते नित्य स्थिर अस्थिर राहून प्रत्येक क्षणी संपूर्ण जीव जंतू, प्राणीमात्रांचे सदैव रक्षण करीत असतात. हे पंचतत्व कधीच कुणाचा द्वेष भाव मत्सर करीत नाही. या पंचमहाभूतांपैकी पहिले तत्व जलतत्त्व आहे म्हणून संपूर्ण जगात 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. आपल्या भारत देशाला चौबाजुंनी पाणीच आहे पाण्याचे किती अनन्य साधारण महत्त्व आहे की मानवी जीवनामध्ये दैनंदिन काळात आपण काही वेळ काही काळ अन्न वाचून राहू शकतो परंतु पाण्या वाचून जिवंत राहणे कुणालाही कदापिही शक्य नाही. आपण जन्म घेताना शुक्रश्वनीत द्वारा गर्भामध्ये जन्म घेतो वीर्य हे पाणीच आहे म्हणून आपला जीवन आरंभ पाण्यापासूनच सुरू होतो. गर्भामध्ये राहत असताना पाणी पातळी सतत मोजली जाते. आईच्या उदरातून या जगात आल्यावर पहिले आपल्याला पाणी देऊनच जगण्याची सुरुवात करतात, त्यानंतर आपल्या शरीराला दररोज 71% पाणी लागते. थोडे निरीक्षण, थोडे परीक्षण करा. बघा मानवी जीवनात पाण्याचे काय महत्त्व आहे. आपल्या प्रत्येकाची दिवसाची सुरुवात पाण्यापासूनच होते आणि पहा स्नान दिनचर्या मध्ये पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे स्नानाला पाणी, पाणीमय तेल, शाम्पू मध्ये पाणी, साबणाचा वापर पाण्यासोबत, कपडे धुणे, स्वयंपाकासाठी, पिके भाजीपाला फळे फुले तयार करण्यासाठी पाणीच लागते. अति आनंद किंवा अति दुःख झाली तर डोळ्यात टचकन पाणीच येते. आपल्या तोंडातही सतत लाळच असते. पचनाला, किडनीला, हृदय, मेंदू, यांना पाण्याची सतत गरज असते. आपण पुण्य मिळवण्यासाठी कुठल्यातरी नदीमध्ये स्नानाला जातो कोणताही संकल्प करताना हातात पाणी घेतो, पूर्वीच्या काळी ऋषीमुनी क्रोध आला तर हातातील कमंडलू मधील पाणी हातावर घेऊन शाप देत असत. सर्व विधिवत पूजा पाठांमध्ये डोळ्याला पाणी लावूनच संकल्प केला जातो. दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणी धोका दिला किंवा विनाकारण खर्च झाला तर पाण्यात गेला अशी जुनी म्हण आहे. पाणी दिसण्यासाठी सर्वांना सगळीकडे सारखेच दिसते परंतु पाण्यामध्ये 12 क्षार असतात भारतीय संस्कृती आणि आरोग्य विभागामध्ये 12 क्षार ही उपचार पद्धती सर्वांना माहीत आहे. आपण रोज जेवणामध्ये वापरतो ते मीठ समुद्रातील पाण्याचा एक क्षार आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये मिठाचे विशेष महत्त्व आहे. आहारामधून मीठ वगळले तर ते बेचव होते व मनुष्याचे हातपाय काम करत नाही परंतु आपण समुद्राचे पाणी पिऊ शकत नाही तेच समुद्राचे पाणी पावसाद्वारे शुद्ध होऊन जमिनीवर येते पावसाचे पाणीही आपण पिऊ शकत नाही जेव्हा ते पाणी डोंगर दर्या जमीन पर्वतरांगा यामध्ये आदळत येते तेव्हा ते structured वॉटर होते म्हणजेच मोत्यासारखे पाणी होते त्यालाच गंगाजल असे म्हणतात. अतिशय शुद्ध अमृता समान पाणी हे ईश्वराज्य नैसर्गिक देणगी आहे व ते शुद्ध पाणी सर्वांना मिळावे हाच रेकी जलचा उद्देश आहे.

आमचे दृष्टिकोन

जिथे स्वच्छ पाणी म्हणजे आरोग्यदायी जीवन

मित्रहो, आपल्याला आठवत असेल की साधारणतः 40 वर्षांपूर्वी आपण प्रवासादरम्यान नदीमध्ये जीरा झाकून पाणी पीत असत, पाण्यामधून आपल्याला सर्व नैसर्गिक शक्ती मिळत असे परंतु निसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या माणसाच्या प्रयत्नामुळे सध्याची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की अनेक आजारांनी मानवांना वेठीत धरले आहे शारीरिक मानसिक आजार हे आधुनिक जीवनातील मानवाचे अविभाज्य घटक बनले आहे. मोबाईल स्पीडच्या (Digital) युगात कोणीही एका सेकंदाची वाट पाहण्यास तयार नाही. आहारातील भेसळीने आहाकार माजवलेला आहे विकासाच्या नावाखाली लाखो टन केमिकल, फर्टीलायझर, पेस्टिसाइड, कारखान्यातील दूषित पाणी रोज पाण्यात आणि जमिनीवर सोडले जाते. भाजीपाला फळे आणि अन्नावर इतके प्रयोग केले जात आहे की सर्व पदार्थ विषयुक्त मिळत आहे. आज कोणत्याही नदीतील पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. माणसाने इतकी भेसळ केली आहे की पाणी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच मसाले, देवाचा प्रसाद, कपाळावरती लावण्याचे कुंकू सुद्धा भेसळयुक्त करण्याचे सोडले नाही. आपण काय खातो काय पितो याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. जमिनीतील पाण्याचा टीडीएस धोक्याबाहेर गेला आहे सर्व आजार हे पाण्यापासूनच निर्माण होतात. म्हणून पाणी बदला म्हणजे तुमचे आरोग्य व जीवन बदलेल. या आणि पुढच्या काळात शुद्ध पाणी पिण्यासाठी रेकी जल इंटरप्राईजेस प्रयत्न करीत आहे. पुढच्या दीर्घकालीन परिस्थितीचा विचार करता अन्न व पाणी भेसळीतून मुक्त राहण्यासाठी रेकी जल हा एकमेव पर्याय आहे

मुख्य वैशिष्ट्ये

दररोजच्या वापरासाठी डिझाइन केलेले

रे म्हणजे वैश्विक आणि ती म्हणजे चावी. नैसर्गिक आरोग्याची वैश्विक शक्ती म्हणजे रेकी जल

ही जलशक्ती सेलिब्रेटी, उद्योजक, खेळाडू परदेशातून पाणी आणत असत तेच पाणी आता सामान्य माणसाला आपल्या गावात राहत्या शहरात उपलब्ध आहे.

संस्थापक अध्यक्ष

श्री. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर

संत साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रख्यात कथा कीर्तनकार, मुद्रा योगाचार्य, रेकी, EFT, Hu Pono Pono या आंतरराष्ट्रीय लाईफ बॅलन्स सिस्टमचे योगशिक्षक, WPC या विश्वशांती केंद्र आळंदी जागतिक मंचाचे कार्याध्यक्ष

आमचे व्यवस्थापन

उत्पादक, निर्यातदार आणि विक्रेता

  • प्रॉडक्ट

    रेकी जल आयोनायझर एक मेडिकल डिव्हाइस आहे. जापानीज टेक्नॉलॉजीवर आधारित हाय तंत्रज्ञानाने युक्त डिजिटल निर्मित, हाय-क्वालिटी, हाय टायटॅनियम गोल्ड प्लेटेड व आधुनिक तंत्रज्ञान युक्त युजर फ्रेंडली प्रॉडक्ट

  • मॅनेजमेंट

    सदरील उत्पादन हे वापरावयास अतिशय सोपे बनविले असून इन्स्टॉलेशन ते वॉरंटी प्रोव्हाईड करतात. ३ ते ११ टायटॅनियम गोल्ड प्लेटेड मध्ये उपलब्ध आहे

  • सर्व्हिस

    स्थापनेपासून १० वर्षांपर्यंत पूर्ण वॉरंटी आणि वॉरंटीनंतर एक्सचेंज सुविधा उपलब्ध.

आमचे प्रॉडक्ट

आनंदी कुटुंबांद्वारे विश्वसनीय

ग्राहकांचे अभिप्राय

आमच्या ग्राहकांना आवडले

महाराष्ट्र राज्यातील महागायिका.सौ कार्तिकी गायकवाड पिसे, आज श्री क्षेत्र आळंदी येथे उपस्थित राहून मला रेकी जल आयोनायझर अल्कलाइन वॉटर चे उद्घाटन करण्याचे सौभाग्य लाभले आपले जीवन हे सदैव पाण्यावर अवलंबून आहे पाणी आपल्याला दिसायला जरी सारखे दिसत असले तरी पाणी मध्ये टीडीएस, पीएच, ओआरपी असतो आणि त्या मधून आपल्या शरीराला आवश्यक असते असे घटक मिळत असतात. परंतु आता महाराष्ट्रात सर्वत्र कुठेही पाणी पिण्यासाठी योग्य नाही. सतत काहीतरी नवीन विकास या निमित्ताने केमिकल, फर्टिलायझर, पेस्टिसाइड असे विषारी द्रव्य पाण्यात मिसळून जातात आणि आपले आरोग्य धोक्यात आले आहे तरी आपण आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना पुढच्या काळात निरोगी राहण्यासाठीरेकी जल आयोनायझर अल्कलाइन वॉटर चा उपयोग करावा

आज मला रेकी जल याचा अर्थ कळला मानवी जीवन अतिशय मूल्यवान आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे भेसळ होत आहे भाजी pala फळेही चांगले राहिले नाही, दूषित पाण्यामुळे हजारो आजार जडत आहे आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना निरोगी राहण्यासाठी रेकी जल याचा नॅचरल उपयोग होईल असा विश्वास आहे

पंडित श्री कल्याण गायकवाड

वाशिम जिल्ह्याला आकांक्षित अवस्थेतून प्रेरणादायी दिशेने नेणारा हा सकारात्मक बदलाचा प्रवास आहे

हा उपक्रम वाशिम जिल्ह्याला सकारात्मक बदलाच्या दिशेने नेणारा एक प्रेरणादायी प्रवास दर्शवतो. जलसंवर्धन, श्रमदान आणि जनजागृती यांच्या माध्यमातून शाश्वत विकासावर भर दिला जात आहे. ‘जलचेतना 3.0’ सारख्या उपक्रमांमुळे कृतीतून परिवर्तन घडवण्याची भावना निर्माण होते. प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांचा सक्रिय सहभाग या चळवळीची ताकद आहे. प्रत्येक थेंबाचे जतन आणि प्रत्येक प्रयत्न उज्ज्वल भविष्य घडवतो. हा प्रवास केवळ उद्दिष्टांपुरता मर्यादित न राहता परिणामकारक कृतीकडे वाटचाल करतो. एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य होत आहे. या कार्याची दखल घेऊन पुण्यनगरी व देशोन्नती यांसारख्या वृत्तपत्रांनी बातम्या व लेख प्रसिद्ध करून या उपक्रमाला माध्यमांतून योग्य ओळख दिली.